लिहिण्याची आवड अनेकांना असते. तशी आवड शासकीय सेवेत असूनही शहाजी कांबळे यांनी जोपासली आणी मनात हळुवारपणा जपून अनेक विषयांवर मनातील विचार ते लिहित गेले. जे सहज सुचले, जे मनाला स्पर्शून गेले, जे स्वतः अनुभवले, ते त्यांनी 'सहज लिहिताना...'मधून मांडले आहे.
यात पत्नीचा सोशिकपणा, माहेरपानाला आलेल्या मुलीच्या आठवणी, जन्मगाव वालचंदनगरमध्ये अनुभवलेले सुंदर जीवन, हादग्याची भाजी, रानकवी यशवंत तांदळे यांचे कवितावाचन, विस्मृतीस गेलेले बालपण, मित्राच्या वतीने त्याचा प्रेयसीला लिहिलेले प्रेमपत्र, बालपणातील हट्टीपणा, कॉलेजमध्ये समजलेले पैशाचे महत्व, रोमँटिक चित्रपटांची आवड, लोणावळ्याची मजेशीर आठवण, अण्णापूर गावातील वसाहतीमधील घर, नोकरीमुळे कलेकडे करावे लागलेले दुर्लक्ष, पत्नीला दिलेली ठुशीची भेट, पत्नीशी गप्पा मारण्याचा छंद,
स्वतःच्या हाताने फुलविलेली बाग, बसमध्ये भेटलेल्या गृहस्थांशी जोडलेले आपुलकीचे नाते असे विविध अनुभव लेखकाने यात शब्दबद्ध केले आहेत.